
अमिताभ बच्चन यांचा ‘अजूबा’ हा चित्रपट शशी कपूर यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केला होता. त्या काळात हा चित्रपट ८ कोटींमध्ये बनला होता. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो सुपरफ्लॉप ठरला. या चित्रपटामुळे शशी कपूर यांना ३.५० कोटींचे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे शशी यांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. त्याकाळी हा तोटा भरून काढण्यासाठी शशी यांना आपली काही मालमत्ता देखील विकावी लागली. तर, ‘उत्सव’ या चित्रपटाच्या वेळी देखील त्यांना तब्बल दीड कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते.






