
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याने वातावरण तापलं आहे. मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे, असे वक्तव्य संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलं होतं. त्यावर संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का, असा उलट सवाल शरद पवार (Sharad pawar) यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला केला. त्याचबरोबर ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडल्याचीचर्चा आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवारांनीही यावरून सरकारलाकानपिचक्या दिल्या आहेत.