
मराठा व ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलं आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, तर ओबीसी समाजाकडून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला विरोध आहे. काही दिवसापूर्वी या प्रश्नावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, पण महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र आज झालेल्या मुख्यमंत्री व शरद पवार बैठकीमुळे ही बैठक पुन्हा होणार असल्याची शक्यता वाढली आहे.