
सत्यप्रेम कथाला मिळवण्यासाठी कोणताही धोका पत्करण्यास तयार आहे. दरम्यान, या दोघांचे लग्न होईल, अशा पद्धतीने कथा फिरते. आयुष्याच्या या नव्या प्रवासात सत्यप्रेम इतका खूश आहे की, त्याच्या आनंदाला उधाण आलं आहे. पण, या नात्यात कथाला काहीतरी त्रास होत आहे, जो तिला या नात्यात टिकू देत नाहीय. आता लग्नाच्या या गुंतागुंतीच्या नात्यात दोघेही एकत्र राहू शकणार की वेगळे होणार, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.