
झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील अद्वैत आणि नेत्रा या पात्रांनी सर्वांची मने जिंकली आहेत. आता मालिकेत नवे वळण आले आहे. पद्माकर आजोबांच्या मृत्यूनंतर राजाध्यक्ष कुटुंब इंद्राणीला बेघर होऊ देत नाही. तिला घरातच राहू दिले जाते. पण इंद्राणीला काहीतरी चुकल्यासारखे वाटते, अशाच एक दिवशी व्दिधा मनस्थितीत असताना इंद्राणीला साधू भेटतात, जे तिला लहानपणीही भेटले होते. ते तिला सांगतात त्रिनयना देवीने तुझ्यावर नेत्राला वाचवण्याची जबाबदारी सोपवली आहे.








