आता एक मोठी बातमी सातारा जिल्ह्यातून, ताऱ्यातील औंध पुसेसावळी येथे काल दोन गट आपापसांत भिडले होते, सोशल मीडियातील पोस्टवरून वातावरण बिघडल्याची माहिती आहे, त्यानंतर अनेक वाहने पेटवण्यात आली आणि मोठा तणाव निर्माण झाला, या घटनेनंतर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय, तसेच पुढील तणाव टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झालाय, यात दोन्ही गटाचे चार लोक जखमी झालेत, त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिलेत.








