
मुंबई, सोलापूर, सांगली, अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमात जवळपास ४००० महिला पत्राद्वारे आपल्या बहिणीशी व्यक्त झाल्या. काहींनी तर आम्ही हे कदाचित कधीच बोलू शकलो नसतो पण तुमच्या या मालिकेच्या निमित्ताने मनातल्या गोष्टी पत्राद्वारे सांगता आल्या म्हणून या मालिकेचे आणि झी मराठीचे आभार देखील मानले.








