
या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शर्मिष्ठा राऊत म्हणाली, ‘ही कथा दोन बहिणींवर आधारित आहे. ज्या दोन वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये राहतात. त्यांच्यामध्ये वेगळेपण असूनही किती साम्य असू शकते, हे दिसून येईल. प्रेक्षकांनी प्रोमो बघितलाच असेल आणि मला खात्री आहे की, प्रेक्षक या मालिकेशी भावनिकरित्या जोडले जातील. कुटुंबामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला भाऊ-बहीण असतील पण ते आपल्या जवळ असतीलच असं नाही. काही जण कामासाठी, शिक्षणासाठी दूर परदेशात असतात. तर, काही वेगळ्या कारणांमुळे एकमेकांपासून दुरावलेले असतात. पण कितीही अंतर असलं तरीही मनाने आपण जवळच असतो. संस्कृती आणि नातेसंबंध हे किती महत्वाचे आहेत हे प्रेक्षकांना या मालिकेतून बघायला मिळेल.







