
Beed News: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. याप्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली. मात्र, अजूनही दोन आरोपी फरार असून त्यात वाल्मिक कराडचा समावेश आहे. वाल्मिक कराडला अद्यापही अटक न झाल्याने विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.