
किती दिवस नेहरू, नेहरू करणार? तुमचं काम दाखवा!
‘कुठलाही प्रश्न आला की नेहरू. पाऊस जास्त पडला तरी नेहरू, पाऊस कमी पडला तरी नेहरू, दुष्काळ पडला नेहरू हे यांचं सुरू आहे. किती दिवस काँग्रेस आणि पंडित नेहरूंवर बोलणार? नेहरूंनी चुका केल्या असं म्हणत असाल तर तुम्ही दुरुस्त करा. मणिपूरचा प्रश्न नेहरूंमुळं निर्माण झाला असेल तर तुम्ही सोडवून दाखवा. दहा वर्षे सरकार आहे तुमचं, तुम्ही काय करताय? वाजपेयी, मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंग ही सर्व सरकारं नेहरूंच्या विरोधातच आली होती. त्यांनी आजपर्यंत हा प्रश्न का सोडवला नाही?, असा रोकडा सवाल संजय राऊत यांनी केला.






