
मिळालेल्या माहितीनुसार, विजयपूर -गुहागर महामार्गावर (vijaypur guhagar highway) सांगली जिल्ह्यातील जतवरून येणाऱ्या जत- मुंबई ट्रॅव्हल्सला क्रूजर गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात क्रूजरमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाले तर २ जणांनी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच अंतिम श्वास घेतला.





