
भिडे यांनी महात्मा गांधी यांची बदनामी केली आहेच, शिवाय माझ्या कुटुंबाचाही अवमान केला आहे. गृहमंत्र्यांनी तपास करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात काही झालेलं नाही. त्यामुळं आम्हाला न्याय मागावा लागत आहे. त्यासाठीचं पहिलं पाऊल आम्ही आज उचललं आहे. पोलीस ही तक्रार गांभीर्यानं घेऊन पोलीस आपलं कर्तव्य बजावेल व संभाजी भिडे आणि त्याच्या संघटनेवर योग्य ती कारवाई करेल, असा विश्वास तुषार गांधी यांनी व्यक्त केला.