
सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर का?
१९९८ मध्ये सलमान खानच्या ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाची राजस्थानमध्ये शूटींग सुरू होती. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळवीटची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला. त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. परंतु, नंतर त्याला जामीन मंजूर झाली. बिश्नोई समाजात काळवीटला पवित्र मानले जाते. यामुळे सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर होता. बिश्नोईची गँग सातत्याने चर्चेत राहण्यासाठी हाय प्राफोईल लोकांना लक्ष्य करते, असे तपास यंत्रणांनी सांगितले आहे.







