
मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार हे वारंवार मुंबई ते पुणे असा प्रवास करत असतात. मग कधी कामानिमित्त असेल तर कधी कुटुंबीयांना भेटण्यासाठी असेल. त्यांचा प्रवास हा सुरुच असतो. या प्रवासादरम्यान, अभिनेत्री ऋजुता देशमुखला आलेला अनुभव तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला. तिने या व्हिडीओच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांचे अनुभव देखील सांगितले. आता पुन्हा एकदा ऋजुताने व्हिडीओ शेअर करत “या विषयाचे पुढे काही होत नाही” असे म्हटले आहे.








