
भारताच्या विस्तृत राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कमध्ये अंदाजे ८५५ टोल प्लाझा आहेत. त्यापैकी सुमारे ६७५ सार्वजनिक अनुदानित आहेत. तर, उर्वरित १८० सवलतीधारकांद्वारे चालवले जातात. टोल वाढ ही राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, २००८ अंतर्गत येते. लोकसभा निवडणुका संपताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोलच्या दरात वाढ करण्यात आली. यामुळे सर्वसामन्य नागरिकांच्या खिशाला खात्री लागणार आहे. वाढ टोलमुळे फळे आणि फळभाज्यांसह इतर गोष्टीच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.







