
वसई जेटी येथून शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी पहिली बोट सोडण्यात येणार आहे. भाईंदर आणि घोडबंदर जेटींचेही उद्घाटन होणार आहे. मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. जान्हवी नावाच्या कंत्राटदाराच्या बोटीमध्ये एकाच वेळी ४० वाहने आणि १०० लोक एकाच वेळी प्रवास करू शकतात. सध्या १३ फेऱ्यांसाठी वेळ निश्चित करण्यात आली. लोकांचा प्रतिसाद पाहून वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.






