
यावेळी त्याने सत्य समोर आणण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, यात तो स्वतःच अडकला. यावेळी दीपाशी बोलत असतानाच साक्षीच्या पतीच्या प्लॅनमुळे पोलिसांच्या तावडीत अडकतो. यावेळी पुन्हा एकदा कार्तिकच्या मनात दीपाविषयी गैरसमज निर्माण केला जातो. दीपानेच कार्तिकला पकडून दिले, असे त्याला सांगितले जाते. याचाच राग कार्तिकच्या मनात राहिला आहे. हाच राग मनात धरून तब्बल १४ वर्षानंतर तुरुंगाबाहेर आलेला कार्तिक दीपाकडून बदला घेणार आहे.