
कार्तिक तुरुंगात गेल्याच्या क्षणापासून कार्तिकी दीपाचा तिरस्कार करत आहे. तर, दीपिकाने मात्र नेहमीच आपल्या आईला खंबीर साथ दिली. या १४ वर्षांच्या काळात कार्तिकीला काही पत्र मिळाली, जी कार्तिकने लिहिली आहेत, असा तिचा समज आहे. या पत्रांमधून कार्तिकने कार्तिकीला दीपाबद्दल चुकीच्या गोष्टी सांगून तिच्या मनातील रागाला आणि तिरस्काराच्या भावनेला आणखी खतपाणी दिलं. या पत्रांमुळेच कार्तिकीच्या मनातील द्वेष आणखी वाढला.







