
बाल कौन्सिल ऑफ इंडियाचं सरन्यायाधीशांना पत्र
बार कौन्सिल ऑफ इंडियानं बुधवारी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहून २२ जानेवारीला न्यायालयाला सुट्टी देण्याची विनंती केली आहे. ‘२२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेला कार्यक्रम हा देशभरातील कोट्यवधी लोकांसाठी धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीनं महत्त्वाचा आहे, असं बार कौन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.








