
महाराष्ट्रासह देशातील १५ राज्यातील ५६ राज्यसभा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सर्व जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग (ECI) कडून सोमवारी याबाबत घोषणा केली आहे.१३ राज्यातील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी समाप्त होत आहे. तर २ राज्यातील ६ सदस्य ३ एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. ज्या १५ राज्यात राज्यसभा निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश आदि राज्यांचा समावेश आहे.








