
मात्र, इंडस्ट्रीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या राजकुमार रावसाठी इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. राजकुमार राव कामाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाला होता. सुरुवातीच्या काळात मुंबईत संघर्ष करत असताना त्याच्यावर एक वेळ अशी आली होती की, पार्ले जी बिस्किटं खाऊन तो स्वतःचं पोट भरत होता. हा असा काळ होता, जेव्हा त्याच्या बँक खात्यात साधे १८ रुपयेही शिल्लक नव्हते. त्या संघर्षाच्या काळात काही मित्रांनी त्याला खूप मदत केली. राजकुमार रावला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते आणि त्यामुळेच त्याच्याकडे ‘प्लॅन बी’ असे काहीच नव्हते.








