
हिंदी चित्रपटसृष्टीला लागोपाठ हिट चित्रपट देणारे, मनोरंजन विश्वाचे पहिले ‘सुपरस्टार’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राजेश खन्ना आता आपल्यात नसले, तरी त्यांच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत. ‘जिंदगी नहीं लगी, बडी होनी चाहिये बाबू मोशाय’ सारखा त्यांचा संवाद आजही अनेकांच्या मनावर कोरला गेला आहे. राजेश खन्ना यांनी केवळ आपल्या अभिनयानेच प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर चित्रपटसृष्टीतही त्यांनी विशेष योगदान दिले.







