Rajasthan Bandh : सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर राजस्थान पेटले! अनेक ठिकाणी जाळपोळ आणि अघोषित बंद

0
18
Rajasthan Bandh : सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर राजस्थान पेटले! अनेक ठिकाणी जाळपोळ आणि अघोषित बंद


सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्याकांडानंतर राजपूत समाजात प्रचंड संताप पसरला आहे. राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात नागरीक जयपूरला पोहोचले आहेत. जयपूरच्या मेट्रो मास हॉस्पिटलबाहेर आंदोलन सुरूच करण्यात आले आहे. राजस्थान बंद हा शांततेत शांततेत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे. आंदोलनस्थळी राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष महिपाल सिंह मकराना यांनी प्रसारमाध्यमांना बोलतांना त्यांच्या तीन मागण्या असल्याचे सांगितले. एनआयएकडून या प्रकरणाचा तपास करण्यात यावा, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून या प्रकरणाचा तपास करण्यात यावा असा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. गोगामेडी यांच्या मारेकऱ्यांचा जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत राजस्थानमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ घेऊ देणार नाही, असा देखील इशारा आंदोलकांनी दिला आहे.



Source link