
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मागच्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी घडल्या आहे. बदललेली राजकीय समीकरणं, पक्षफोडाफोडी यामुळे राज्याच्या राजकारणाचा चिखल झाल्याची टीका राज ठाकरेंनी केली. तसेच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालाय त्याला शरद पवार हेच (Sharad Pawar) जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी केला आहे.




