
“गणेश उत्सवात १० दिवस आणि मुख्यतः मिरवणुकांच्या वेळेस डीजे, डॉल्बी यांच्या आवाजाच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणे आणि मृत्यू येणे किंवा तात्कालिक किंवा कायमचे बहिरेपण येणे. मागील काही वर्षांपासून मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाण्याचे प्रकार वाढले. लोक मिरवणुकीत येतात, नाचतात, आनंद व्यक्त करतात आणि निघून जातात. परंतु, पोलीस प्रशासन आणि त्या भागात राहणारे स्थानिक रहिवासी असतील, त्यांची अवस्था गंभीर आहे. सलग कानावर आवाज पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.