
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ ची रविवारी १७ मार्चला मुंबईत शिवाजी पार्कवर सायंकाळी पाच वाजता जाहीर सभेने सांगता होणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून या सभेच्या पोस्टरचे लॉन्चिंग आज (बुधवार) करण्यात आले. या पोस्टरमध्ये ” शिवतीर्थावर होणार न्याय गर्जना, न्यायासाठी लढायचं गद्दारांना नडायचं, संविधानाला टिकवायचं, आठवणीने यायचं अशा आशयाचा मजकूर आहे.