Rahul gandhi | “मोदी गेले तर अदानी गेले, गरीबांनी संविधान वाचवलं”, निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींची प्रतिक्रीया | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Rahul gandhi | “मोदी गेले तर अदानी गेले, गरीबांनी संविधान वाचवलं”, निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींची प्रतिक्रीया | Navarashtra (नवराष्ट्र)


“मोदी गेले तर अदानी गेले, गरीबांनी संविधान वाचवलं”, निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींची प्रतिक्रीया


Rahul gandhi on Narendra Modi: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर टिका केली आहे.

लोकसभा निवडणुकीतील सात टप्प्यातील निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांवर झालेल्या निवडणुकीचे ट्रेंड समोर आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सपा 35 जागांवर तर भाजप 34 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे. 1 लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर असलेले अनेक प्रमुख उमेदवार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या नावांचा समावेश आहे. याचदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर टिका केली आहे.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सीबीआय, ईडी, अर्धी न्यायव्यवस्था यांना धमकावलं, ताब्यात घेतलं. लढाई संविधान वाचवण्याची होती. आमची लढाई घटनात्मक संस्था वाचवण्यासाठी होती. जनता अदानीना मोदींशी रिलेट करते. मोदी गेले तर अदानी गेले. आज शेअर बाजारात हेच दिसून आलं. गरीबांनी संविधान वाचवलं” असं राहुल गांधी म्हणाले. सरकार स्थापनेच काय करायच? त्या संदर्भात उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीत घटक पक्षांशी चर्चा करुन पुढची भूमिका ठरवू” असं राहुल गांधी म्हणाले.






Source link