
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाआधीच भाजपने निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. राहुल गांधी यांच्या सभेच्या चार दिवसानंतर त्यांच्याकडून आचार संहितेचं उल्लंघन झाल्याची तक्रार भाजपच्या नेत्यांनी आयोगाकडे केली आहे. राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारात खोटं बोलत आहेत,त्यांना थांबवा त्यांना राग द्या असं भाजपने आपल्या तक्रारीत म्हटलंय.







