
टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासला या चार धरणांमध्ये २४.९५ टीएमसी पाणीसाठा झाला. पानशेत धरण पूर्ण भरले आहे. तर वरसगाव धरण देखील भरण्याच्या मार्गावर आहे. यमुळे पानशेत धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग वाढवून पहाटे ४.०० वाजता १५ हजार १३६ क्यूसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग सोमवारी सकाळी ९.०० वाजता वाढवून २२ हजार ८८० क्यूसेक करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. व नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास त्यांना तात्काळ हलवावे असे आवाहन मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.







