
जळगाव: भरधाव कारची दुचाकीला धडक, चौघांचा मृत्यू
जळगाव येथील रामदेववाडी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत एका महिलेसह तिच्या तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राणी सरदार चव्हाण (३०), सोमेश सरदार चव्हाण (वय, २), सोहन सरदार चव्हाण (वय, ७), आणि लक्ष्मण भास्कर राठोड (वय,१२) अशी मृतांची नावे आहेत. अपघात इतका भीषण होता की आलिशान कारच्या धडकेनंतर दुचाकीचा चक्काचूर झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी रास्ता रोको करत दगडफेकही केली.




