
राजस्थानमधील एका प्रचार सभेत बोलताना प्रियांका गांधी-वाड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ही टीका आचार संहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर आयोगाने प्रियांकांना नोटीस बजावली आहे.
जयपूर : प्रियांका गांधींना पंतप्रधान मोदींवरील टीका भोवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमधील एका प्रचार सभेत बोलताना प्रियांका गांधी-वाड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ही टीका आचार संहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर आयोगाने प्रियांकांना नोटीस बजावली आहे.
प्रियंका गांधी यांनी राजस्थानमधील दौसा इथं एका सभेला संबोधित करताना मोदी यांच्यावर टीका केली होती. निवडणूक आयोगाने प्रियंका यांना नोटीस पाठवून ३० ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या नोटीसला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.









