
जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनाही ऑफर
केंद्रातील मोदी सरकारविरोधात राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडी आकाराला आली आहे. या आघाडीतील सर्व पक्ष गंभीरपणे भाजपच्या विरोधात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपला सत्ता राखायची असेल तर जुळवाजुळव करावी लागणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला फोडूनही भाजपला मोठा लाभ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पाडण्यात आली आहे. मात्र, शरद पवार जोपर्यंत भाजपकडं जात नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादीच्या फुटीला फारसा अर्थ नाही. शिवाय, शरद पवारांनी बाजू बदलणं हा इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप पवारांसोबतच जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सामावून घेण्यास तयार आहे.







