
मुक्ताला व्हिलन ठरवण्याचा सावनीचा डाव
माधवी गोखलेच्या घरी काय झाले हे आदित्य सावनीला सांगत असतो. पण तेवढ्यात पोलीस घरी येतात आणि आदित्यला अटक करायला आलो आहोत असे सांगतात. मुक्ता कोळींनी तक्रार दाखल केली असल्याचे पोलीस सांगतात. सावनी त्यांच्यासमोर हातापाया पडते आणि आदित्यला अटक न करण्यास सांगते. या सगळ्या प्रकारामुळे आदित्य दुखावला जातो. आदित्यच्या मनात पुन्हा एकदा मुक्ताबद्दल रोष निर्माण होतो. सावनीच्या घरात आलेले पोलीस हे खोटे असतात. सावनी आणि हर्षवर्धन यांनीच हे खोटे पोलीस आणलेले असतात.