
दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी टीव्ही अँकरचे अपहरण करण्यात आले. जीवाला धोका असल्याच्या भीतीने टीव्ही अँकरने महिलेच्या फोनला प्रतिसाद देण्यास तयार झाला. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकारानंतर अँकरने उप्पल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेसह अपहरणासाठी नेमलेल्या चौघांनाही अटक केली. पुढील तपास सुरू आहे.