
भारतीय संविधानाने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारा घटनेतील कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालय सोमवारी दिला. त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुका घेण्याबाबतचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या यानिर्णयावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीहा निकाल घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे.





