
नुकतेच झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन लोकसभा, राज्यसभा खासदारांच्या निलंबनामुळे चांगलेच गाजले होते. त्यातही 11 सदस्यांचे प्रकरण वरिष्ठ सभागृहाच्या विशेषाधिकार समितीकडेही पाठविण्यात आले होते.
नवी दिल्ली : नुकतेच झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन लोकसभा, राज्यसभा खासदारांच्या निलंबनामुळे चांगलेच गाजले होते. त्यातही 11 सदस्यांचे प्रकरण वरिष्ठ सभागृहाच्या विशेषाधिकार समितीकडेही पाठविण्यात आले होते.
संसदेची सुरक्षा भेदून दोन युवकांनी घुसखोरी केल्याप्रकरणी विरोधकांनी दोन्ही सभागृहात एकच गोंधळ घातला होता. यावरून राज्यसभा सभापतींनी 46 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. आता याच खासदारांचे निलंबन रद्द होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.