
आम्हाला भारतात विलीन करा!
रावळकोटमधील अनेक आंदोलकांच्या हातात पोस्टर होते, ज्यात भारतात विलीन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावरून पीओकेमधील लोकांचा पाकिस्तानविरोधातील रोष दिसून येत आहे. या पोस्टर्समध्ये भारतात विलीनीकरणाची मागणी करण्यात आली आहे. काही आंदोलकांचे म्हणणे आहे की आंदोलनाला हिंसक वळण लागले कारण नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. रावळकोटशिवाय तट्टापानी, खुईरट्टा, मीरपूर, सेहंसा आणि मुझफ्फराबादमध्ये हे आंदोलन झाले आहे. पाकिस्तान सरकारनेही सोमवारी सर्व शैक्षणिक संस्था आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय लोकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी कलम जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.








