
Palghar Railway Accident : पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या जयपूर एक्सप्रेसने तीन जणांनी उडवले. यात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर आहे. पालघरच्या विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयाशेजारी हनुमान मंदिर चौक येथील एका बंद रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली. रेल्वे रुळ क्रॉस करत असताना हा अपघात झाला.