
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची कठोर राजनैतिक कारवाई ‘सिंधू स्ट्राईक’ची पाकिस्तानात आधीच अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. जागतिक बँकेच्या एका नव्या अहवालानुसार या आर्थिक वर्षात पाकिस्तानातील सुमारे एक कोटी लोकांना गंभीर अन्न संकटाचा सामना करावा लागू शकतो. भारत सरकारने १९६० मध्ये पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार यापूर्वीच स्थगित केला आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देणे बंद करत नाही, तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे भारताने म्हटले आहे.







