
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला मोदी सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण आणि ११० जणांना पद्मश्री अशा एकूण १३२ जणांचा सन्मान करण्यात आला आहे. माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि अभिनेता चिरंजीवी यांना पद्मविभूषण देण्यात आला असून अभिनेते मिथुन चक्रवर्ती, राम नाईक, आदिना पद्मभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे.








