
गेल्या २० वर्षांपेक्षा आधिक काळ नितीन देसाई कलाविश्वात काम करत होते. त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ अशा अनेक हिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले. त्यांना आजवर चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून पुरस्कार देण्यात आला. आता त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.








