
NCERT Syllabus Change : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने अभ्यास क्रमात काही बदल केले आहेत. इयत्ता १२वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातून बाबरी मशीद, हिंदुत्वाचे राजकारण, २००२ गुजरात दंगल आणि अल्पसंख्याकां संदर्भात असलेले काही प्रकरणे काढून टाकली आहेत. नव्या सत्रापासून बदललेला अभ्यासक्रम लागू होणार आहे. अलीकडच्या काळात एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच अभ्यासक्रमातील संवेदनशील विषय देखील काढून टाकण्यात आले आहेत.








