
यावेळी रमा आनंदीला राघवच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी नाही, तर राघव आणि आनंदीला एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी आली आहे, असेच वाटत आहे. वाईट करणाऱ्यांना अद्दल घडवायला आणि चांगल्या लोकांना मदत करायला रमा पुढाकार घेणार आहे. आता रमाच्या येण्याने प्रेक्षकांना नक्कीच आणखी धमाल अनुभवायला मिळणार आहे. दुसरीकडे आता आनंदी देखील सगळ्यांना आनंदाची बातमी देणार आहे. तिच्याकडे आता नवा गोड पाहुणा लवकरच येणार आहे.







