
फडणवीस म्हणाले, पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचे पत्र प्रकाशित करण्यात आले होते. ज्याने ते प्रकाशित केले होते, त्याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. आरोपीचे एका व्यक्तीशी जुने वैमनस्य असल्याने त्याने दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका असा मजकूर असलेले पत्रक काढले होते. काही राजकीय नेत्यांनी काल ते पत्र ट्विट केलंय. माझी त्यांना विनंती आहे, शहानिशा न करता, वस्तूस्थिती न तपासता समाज माध्यमावर पोस्ट केली तर समाजात तेढ निर्माण होईल. कालच्या प्रकरणात सर्व सत्य पुढे आले आहे. तसेच दोषीवर कारवाई करण्यात येईल असे देखील फडणवीस म्हणाले.





