
नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालानंतर देशभरात भाजप मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर आले आहे. या लोकसभेत भाजपला 240 जागा मिळाल्या तर एनडीएला एकूण 292 जागा आहेत. परंतु, भाजपपासून जर त्यांचे मित्रपक्ष दूर झाले तर भाजपला सत्तेचे गणित आखता येणार नाही. त्यामुळे भाजप काय करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. तत्पूर्वी भाजपने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपने मित्रपक्षांसोबत बैठक घेत एनडीएच्या नेतेपदी मोदींची निवड केली आहे, तर राष्ट्रपतींची वेळसुद्धा मागून घेतली आहे. येत्या ७ जूनला सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे.
सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली
लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा पार पडल्यानंतर आता एनडीएकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसंच सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतींनी त्यांना ७ जूनची तारीख दिली आहे.










