
नागपूरमध्ये चार शाळकरी मुलांचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चार मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागली. त्यांनी आरडाओरडा केला मात्र जवळपास कोणीही नसल्याने त्यांनी मदत मिळू शकली नाही व चौघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.




