
हवामान विभागाने आज नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने नागपूरला झोडपले आहे. काल रात्रीपासून पावसाची संतत धार सुरू असल्यामुळे नागपूर शहरातील अतिमहत्वचा असलेल्या सिताबर्डी परिसर, मोरभवन या सह अनेक भाग हा पाण्याखाली गेला आहे. नाग नदीला पूर आल्यामुळे मध्यवस्तीतून पाणी वाहत होते. अनेक रस्त्यांना ओढ्याचे रूप प्राप्त झाले होते. पाण्याच्या प्रवाहात अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्या वाहून गेल्या तर अनेक घरात पाणी घुसले. नागपूरच्या आरबीआय क्वार्टरमध्येदेखील पाणी घुसले होते. गांधीनगर येथील नाग नदीची सुरक्षा भिंत कोसळल्याने अनेक घरात पाणी घुसले. यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी असरा घेतला.





