
मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असावा लागतो. सध्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने एकूण जलसाठी ८० टक्क्यांहून अधिक झाला आहे. या कारणाने आता १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.






