मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे,डोंबिवली भागांमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असून याचा परिणाम लोकल रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर झाला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा आणि ट्रान्स हार्बर लोकल सेवेवरही झाला आहे. दरम्यान मालाड येथील साईनाथ सबवेखाली पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. येथे एक कार अडकली आहे. कारमध्ये अडकून पडलेल्या जोडप्याची मुंबई पोलिसांनी सुखरूप सुटका करण्यात आली. हे दृष्य पाहून मनात धडकी भरते.







