
Aaditya Thackeray on Mumbai murky water : मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी मिळत आहे. या पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित त्रास जाणवत असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. मुंबई महानगरपालिकेला जाब विचारत आदित्य ठाकरे म्हणाले की, यासंदर्भात महापालिकेने खुलासा करावा, नाहीतर मुंबईकर पालिकेच्या दारात येतील, असेही ते म्हणाले.